Posts

गीतामृत: ज्ञान, कर्म आणि भक्तीचा त्रिवेणी संगम

श्रीमद्भगवद्गीता हा केवळ ७०० श्लोकांचा ग्रंथ असला, तरी त्याच्या अर्थावरून शतकानुशतके विद्वानांमध्ये चर्चा झडत आहेत. कोणाच्या मते गीता 'ज्ञानयोगाचा' पुरस्कार करते, तर कोणाला त्यात 'कर्मयोगाचा' जयघोष ऐकू येतो. काही जण मात्र 'भक्तियोगाला' गीतेचा प्राण मानतात. एकाच ग्रंथाचे इतके वेगवेगळे अर्थ का लावले जातात? हे समजून घेण्यासाठी एक गोड उदाहरण पाहूया. कल्पना करा की, गहू, शुद्ध तूप आणि साखर या तीन मुख्य घटकांपासून एक स्वादिष्ट पक्वान्न म्हणजे कणिकेचा शिरा बनवले आहे. आता हा शिरा खाणाऱ्याच्या आवडीनुसार त्याचे वर्णन बदलेल:  गव्हाचे महत्त्व: ज्याला धान्याची चव महत्त्वाची वाटते, तो म्हणेल, "हे गव्हाचा (कणकेचा) शिरा आहे."  तुपाची ओढ: ज्याला स्निग्धता आणि सुवास प्रिय आहे, तो म्हणेल, "हा तर अस्सल तुपाचा शिरा आहे." साखरेची गोडी: ज्याला गोडव्याची ओढ आहे, तो म्हणेल, "हा साखरेचा शिरा आहे." येथे पदार्थ एकच आहे, पण त्यातील कोणता घटक 'मुख्य' मानायचा, हे प्रत्येकाच्या व्यक्तिगत आवडीवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. तंतोतंत हाच न्याय भगवद्गीतेच्या ...

वास्तववादी अभिनयाचे गिरणगाव

Image
नवीन वर्षात मी "असंभव" आणि "अगं अगं सुनबाई.." या त्या-त्या वेळेस नवीन रिलीज झालेल्या चित्रपटांचे परीक्षण लिहिले होते. आज मात्र मी एका जुन्या सिनेमांच्या गल्लीत शिरलो आणि मला वाटते आपल्या फेसबुकच्या सिनेमा गल्लीमध्ये नव्या जुन्या गल्ल्यांना भेट देण्याची मुभा आहे. आज जुन्याच एका चित्रपटाचे परीक्षण लिहित आहे, कारण तो मी आज प्रथमच पाहिला. 2010 सालात रिलीज झालेला, लालबाग परळ! परिंदा, सत्या, ॲनिमल, किल, धुरंदर यासारख्या चित्रपटात असलेला नृशंस हिंसाचार आणि रक्तपात या चित्रपटात 2010 सालात सुद्धा होता हे बघून आज आश्चर्य वाटते. फक्त हिंसाचाराचे नव्हे तर इतरही अनेक बोल्ड विषयावरची दृश्ये अंगावर येतात. मेंदूत रुतून बसतात. "मुळशी पॅटर्न" मधले काही हिंसक प्रसंग पण असेच अंगावर येतात. ‘लालबाग–परळ’ हा मराठी चित्रपट मुंबईच्या गिरणगावातील (मिल कामगार परिसर) वास्तवावर आधारित आहे. गिरणी बंद पडल्यावर किंवा मुद्दाम बंद केल्यावर कामगारांचे आयुष्य उध्वस्त होते. बेरोजगारी, उपासमार, दारिद्र्य आणि असहायता वाढते. या परिस्थितीत काही राजकीय व गुन्हेगारी शक्ती कामगारांच्या रागाचा गैरफायद...

सदानंदची सफर

सदानंद एक कॉमन मॅन असतो. जमिनीवर काहीतरी शोधत असतो. तो वारंवार खाली वाकून बघतो. शेजारून जाणारा त्याच्या ओळखीचा दूसरा अति-कॉमन मॅन: अरे सदानंद, हे काय चाललंय? काय शोधतोयस जमिनीवर?  सदानंद: अहो, माझा 'आनंद' शोधतोय. मघाशी टीव्हीवर बातमी आली की देशाचा 'आनंद निर्देशांक' वाढलाय. माझा आनंद इथेच कुठेतरी पडला असेल, तोच शोधतोय! तेवढ्यात 'साहेब' आणि त्यांचे 'चमचे' पळत येतात. साहेब: (ओरडून) अरे, महागाई कमी झाली! महागाई कमी झाली!  सदानंद: (चमत्कारिक नजरेने) कुठे? साहेब, कुठे कमी झाली? पेट्रोल पंपावर की भाजी मंडईत?  साहेब: (फाईल उघडून) अरे अडाणी माणसा, बाजारात नाही. या 'एक्सेल शीट' मध्ये! बघ, हा लाल ग्राफ खाली गेलाय!  चमचा १: होय साहेब! महागाई इतकी कमी झाली की काल मी स्वप्नात ५००० रुपयांत सोनं घेतलं!  सदानंद: साहेब, सोने सोडा. सकाळी मला कोथिंबीर ८० रुपयांना मिळाली!  साहेब: तुझी चूक आहे! तू 'प्रत्यक्ष' कोथिंबीर का घेतोस? तू 'डिजिटल कोथिंबीर' का घेत नाहीस? स्वस्त जिओ डेटा आहे, तिथून डाऊनलोड कर. पोट डिजीटली भरेल. त्याला म्हणतात 'स्मार्ट डायटिं...

आकड्यांचा तमाशा आणि वास्तवातील निराशा

महागाई निर्देशांक कमी झाला म्हणे...  पण बाजारात पाऊल टाकताच, वाढलेल्या किमतीची थापड बसते, आणि महिनाअखेर खिसा रिकामाच का राहतो?  बेरोजगारी निर्देशांक उतरला म्हणे... पण मग हातात पदवी घेऊन, उभा असलेला तरुण, आजही नोकरीची वाट का पाहत राहतो? नोकरी नको व्यवसाय कर म्हणे... त्या स्वप्नांना कर्जाचे ओझे जड होऊन, बड्या 'मॉल्स'च्या आणि टॅक्सच्या धुक्याखाली, छोटी छोटी दुकाने दिसेनाशी का होतात? जीडीपी खूप वाढला म्हणे... वाढला म्हणे अर्थव्यवस्थेचा आकार, पगार मात्र तिथेच थांबला, जगण्याच्या खर्च मग इतका का वाढला? आनंद निर्देशांक वाढला म्हणे... मग डोक्यावर कर्जाचं ओझं घेऊन, हसणं हरवलेली करोडो सामान्य माणसं, या जगातली नाही आहेत का? दारिद्र्य रेषा सरकली म्हणे... आकड्यांत गरिबी कमी झाली, पण रस्त्याच्या कडेला ट्राफिकमध्ये, भूक आजही भीक मागत उभी का राहिली? भारतीय मेंदूंची वाहवा होते म्हणे... आणि आयटीचं यश जगभर गाजतं, पण त्याच आयटी दुनियेत, भारतीयांविषयी आज द्वेष का वाढला? खड्ड्यांनी भरलेले रस्ते, पावसाळ्यात शहर बुडतं, कोसळणारी झाडं, घाणेरड्या नद्या, हे दृश्य खोटं कसं ठरतं? हे सगळं डोळ्यांनी दिसतं, हा...

भगवदगीतेतील कर्म संदर्भातील सर्व महत्त्वाचे श्लोक

2.47: कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।  मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ अर्थ: आपल्याला फक्त कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्यांच्या फळाविषयी कधीही नाही. कृतींच्या परिणामांची चिंता करू नये. कर्मांच्या फळांची इच्छा धरू नये. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नये.  3.5: न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्। कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ अर्थ: खरं तर कोणीही मनुष्य क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही, कारण प्रत्येक जण आपल्या स्वभावातील गुणांमुळे (प्रकृतीमुळे) कर्म करण्यास बाध्य असतो. 4.16: अर्थ: किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिता: । तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ अर्थ: कर्म काय आहे आणि अकर्म काय आहे, याबाबत विद्वान लोकही गोंधळात पडले आहेत. म्हणून मी तुला कर्माचे खरे स्वरूप सांगतो; ते समजल्यावर तू पापातून मुक्त होशील. 4.17: कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मण: । अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गति: ॥ अर्थ: कर्म काय आहे हे समजणे आवश्यक आहे, विकर्म (चुकीचे कर्म म्हणजे शास्त्र विरुद्ध वर्तन) काय आहे हेही जाणून घ्यावे ला...

अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?

Image
  "अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?" इतक्या लांबलचक नावाचा काल 16 जानेवारीला रिलीज झालेला मराठी चित्रपट मी आज कुमार पॅसिफिक मॉलमध्ये PVR ला पहिला. चांगले मराठी चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघितले पाहिजेत. आणि हो! हा चित्रपट जुन्या पुराण्या टिपिकल मराठी सासू सून छाप चित्रपटापेक्षा वेगळा आहे! केदार शिंदे आणि टीम, तसेच कसलेले कलाकार आहेत म्हटल्यावर चित्रपट चांगलाच असणार हा माझा अंदाज खरा ठरला. पाहिल्या प्रसंगापासून चित्रपट पकड घेतो तो शेवटपर्यंत. सर्वांचाच अभिनय अतिशय उत्तम झालेला आहे. या चित्रपटाची कथा वेगळी आहे. आधी कधीही न वाचलेली, पाहिलेली आणि ऐकलेली. त्याबद्दल लेखकांचे अभिनंदन! आयुष्यात सर्वच काही फील गुड नसतं, आयुष्यातील सगळ्याच उपकथनकांचं हॅपी एंडिंग नसतं, असे सांगून हा चित्रपट वास्तववादी टच देतो. घाटकोपरच्या एका सोसायटीत वडिलांच्या फ्लॅटमध्ये (राजन भिसे, निर्मिती सावंत) रहाणारे दोन्ही नोकरी करणारे मुलगा आणि सून रहात असतात (नकुल घाणेकर, प्रार्थना बेहेरे). सून वर्क फ्रॉम होम असते. सासू सुनेचे वारंवार खटके उडतात. त्यातील काही प्रसंग विनोदी तर काही गंभीर. शेवटी मुलगा सून वेगळ...

भगवदगीतेचे महात्म्य काय आहे?

भगवद्गीता हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर मानवजीवनाचे संपूर्ण मार्गदर्शन करणारा अमृतग्रंथ आहे. महाभारतातील युद्धभूमीवर, अर्जुनाच्या विषादाच्या क्षणी, स्वतः श्रीकृष्णांनी दिलेला हा उपदेश असल्यामुळे गीतेला अद्वितीय स्थान आहे. श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व केवळ शब्दांनी वर्णन करणे कोणालाच शक्य नाही. कारण हा एक अत्यंत रहस्यपूर्ण ग्रंथ आहे. यात सर्व वेद आणि उपनिषद यांचे सार आहे. गीतेचा आशय आणि अर्थ इतका सखोल आहे की, जन्मभर सतत अभ्यास करीत राहूनही त्याचा संपूर्ण थांग लागत नाही. प्रत्येक वेळेस वाचताना नवनवे भाव उत्पन्न होत राहतात, त्यामुळे ही नेहमीच नवी वाटते. नेहमी श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन गीता वाचून त्यावर मनन करू लागल्यास यातील प्रत्येक शब्दात मोठे रहस्य दडल्याचे प्रत्यक्ष अनुभवाला येते. भगवंतांचे गुण, प्रभाव आणि मर्म यांचे वर्णन ज्या रीतीने गीताशास्त्रात केले गेले आहे, तसे इतर ग्रंथांत सापडणे कठीण आहे. कारण इतर ग्रंथांत बहुतेक काही ना काही सांसारिक विषय आढळतात. पण भगवंतांनी गीता हे एक असे अनुपम शास्त्र सांगितले की, ज्यात सदुपदेशाव्यतिरिक्त एकही शब्द नाही. कोणत्याही वयाच्...